१९७४ नंतर थेट २००४ मध्ये दुसरी आवृत्ती निघालेली ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दुर्लक्षित राहिली. कठोर समिक्षेमुळे तिला मराठीत जनाधार लाभला नाही व तिची घोर उपेक्षा झाली. आणि मोठा विरोधाभास असा की ह्याच कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीला काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले. हे सर्व विद्युत भागवत यांच्या प्रस्तावनेत नमुद करण्यात आले आहे. (ता.क. अलिकडेच किरण नगरकर यांच्या "ककल्ड" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.)
तर ही कथा आहे, "कुशंक पुरंदरे" नावाच्या युवकाची.
कादंबरीत फ़्लॅशबॅक आणि जंपकट्स तंत्रांचा वापर आहे.
सुसुत्रता नसलेली, मानवी जीवनाची निरर्थकता-असंबंद्धता दर्शविणारी, स्त्री-पुरुष संबंधांची अनेक गुंतागुंतीची रुपे दाखविणारी, महानगरीय अस्तित्ववादी-शुन्यवादी जीवन चितारणारी अशी अनेक वैशिष्ट्ये या कादंबरीच्या वर्णनार्थ वेगवेगळ्या समीक्षणात आली आहेत.
पण कादंबरी एकदम भन्नाट वाटली. वाचताना "कोसला" ची आठवण झाली. यातील "कुशंक"बरोबरचं "तु" आणि "रघु" ही पात्रं विशेष आवडली. "आरोती" बरोबरचे प्रसंग आणि त्यांचे संवादसुद्धा आवडले. भाऊ पाध्यांनी म्हटल्याप्रमाणे या कादंबरीने नक्कीच मस्तक गरगरवुन टाकलं.
Wednesday, May 2, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment