प्रामुख्याने कार्यकर्त्या व्यक्ती, त्यांचे कार्य, आजुबाजुच्या व्यक्तींशी आलेले त्यांचे संबंध तसेच व्यक्तिगत ताणतणाव यांचे वेगवेगळे रंग या कथांमधुन आले आहेत. (अपवाद: कथा "विदेश" आणि "दुपार" यामध्ये कार्यकर्त्या व्यक्ती नाहीत.)
सर्वच कथांमधुन भावभावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजचे सामाजिक वास्तव प्रखरपणे कधी पार्श्वभुमीच्या रुपाने तर कधी मुळ आशयामध्ये सर्वच कथांमधे आढळते.
"भूमी" वगळता सर्वच कथांना स्त्री-पुरुष संबंधाचे परिमाण आहे.
मानवी मनोव्यापाराचे वेध घेणाऱ्या ह्या कथा तत्कालिन सामाजिक वास्तवाच्या संदर्भामुळे अगदी खऱ्या वाटतात व नक्कीच वाचनीय आहेत.
"चक्रव्युह" ही कथा त्यातल्या क्लायमॅक्समुळे आणि "भावी इतिहास" त्यातल्या नायकाच्या चित्रणामुळे विशेष आवडल्या.
Wednesday, May 2, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment